उलाढाल जिंकण्याची, विषादातच झाली
वीरतेचे निर्मूलन, निर्दयी मार्गी
हुंदके बोडख्या कपाळांचे, अहोरात्री
गुंजतात मनी, मुसमुसती
रंगमहाल रचिला, मृतकांचा पाया
अंगणी सडा, रक्ताने माखलेला
घाव न भरणारे, अंधःकार मनात
सूर्य ही नडे, देण्या प्रकाश
गिरिधरही आता, गेला दूरवर
विरजण न लावी, मलम गीतोपदेश
अमोल पाटखेडकर
०२-डिसेंबर-२०२२
(संदर्भ: महाभारतातील युद्ध सुरु होण्याआधीचा अर्जुनाचा विषाद आणि त्याला क्षमवण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली हे आपल्याला माहित आहेच पण तो विषाद युध्दानंतरही अर्जुनाच्या मनात कसा घर करून कायम राहिला आणि गीतोपदेशाचा मलम सोबत असूनसुध्दा अर्जुन त्यावर विरजण घालू शकला नाही ह्या अर्थी लिहिलेली वरील छोटीशी रचना. )
No comments:
Post a Comment