Saturday, 14 September 2019

निरोप


देहावर ओढून पाणी गणपती गेला गावा
पाण्यावर तरंगतो आता आसव अबोध पावा
भास की आभास तू अंतर्मनीचा देव देवा
काळावर खुणाविसी चिरंतनाचा ठेवा
चरणतम रागदारीला असतोच भैरवीचा सूर हळवा
 निरोप उदास तरीही चेहरा हसराच हवा
 कारण पुन्हा नव्याने नवनवोन्मेषाचा ध्यास जीवा

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

No comments:

Post a Comment