Saturday, 26 November 2022

अपनों की यादे

ठहरा था चाँद, कुछ देर खिड़की में मेरे

चढ़ाये चाँदी का वरख, मेरी दूध की प्याली में


चांदनी ने खूब सजाई, रंगोली मेरे बिस्तर पे 

उसपर सुकून की नींद, आ गयी मेरे नैनो में 


सपने में हुई, कुछ तरोताजा यादें

झंजोड़ गई, जो ह्रदय को मेरे


वो बड़ा सा आँगन वो निम् का पेड़

लगता था बड़ा होकर 

छू लूंगा टहनियों को युहीं सहज

आज लौटकर आया हूँ

आँगन थोड़ा छोटा और पेड़ अधिक ऊँचा हैं


वो एक दादी थी, घिसट घिसट के चलती थी

उस पर हम हसते थे, बेतुकी बाते करते थे

कुछ दर्द शायद उसको थे, जो समझ में न आते थे

एक दिन चल बसी, अपनी राह निकल पड़ी 

उसकी याद आती हैं, आँखे नम हो जाती हैं


वो एक चाचा थे, बेखबर बेवक़्त घर आते थे

फिर घंटो पापा से बातें करते थे

कुछ चाहिए था उन्हें?

सिर्फ पापा से मिलने आते थे

उनके रिश्ते पुराने थे

मेरे भी वो चहिते थे, अब वो नहीं दीखते; कहीभी नहीं दीखते

दिलमे दर्द सा होता हैं, जब याद उनकी आती हैं


एक और चाचा थे, उनके घर त्योहारों के रेले थे

रौनक थी उनके घरमे, खानेपे बुलाते थे

कुछ पेच ऐसे नसीब के, दो जवान बच्चे गुजर गए उनके

अचानक जिंदगी का रंग भंग हो गया, दुखी दुखी से रहते थे

फिर एक दिन, अनंत में विलीन हो गए

खानेका स्वाद, तबसे फीका हो गया हैं


वो एक चचेरा भाई था, बहनो से राखी बंधवाता था

न भूले चुके, राखी भाईदूज घर आता था

प्यार ही प्यार था उसके मन में, रिश्तों को संभालना समझता था

एक दिन निर्दयी यमदूत, उठाकर उसको ले गया

नामुमकिन था मेरा उसको वापिस लाना

सिमटी हुई यादें लेकर अब था चलना 


फिर वो काला दिन आया, पापा को जिस दिन काल ने उठाया

दर्द बहुत गहरा हुआ, घाव अधिक गहरा हुआ

एक टुकड़ा मेरे अंदर का, पापा के साथ ही चल बसा


एक और दर्दनाक हादसा हुआ, मामा का देहांत हुआ

अपना अपना सा लगता था, बेझीझक हाथ जिसने थामा था 

कराहे दिल से निकली, दर्द की धधक सी निकली

रौंदती है मेरे सीने को, याद उसकी आती है


अमोल पाटखेड़कर

२६-नोवेम्बर-२०२२

Thursday, 24 November 2022

दृष्टिकोन

(संदर्भ: सर्वच जर सापेक्ष आहे तर माझ्या दृष्टिकोनाशी तुम्ही सहमत व्हावेच असा मी दुराग्रह करू शकत नाही, तुमचा दृष्टोकोन वेगळा असू शकतो हे मी मान्य करतो. ) 


सापेक्ष आहे सर्व, सत्य हि पूर्ण सत्य नाही

संक्षेप सारांश अर्थ, असत्य हि पूर्ण असत्य नाही


(संदर्भ: आइनस्टाइन ने 'थिअरी ऑफ रिलेटीव्हिटी'  सांगून सर्वच कसे सापेक्ष आहे हे सिद्ध केले आहे. पूर्ण सत्य आणि पूर्ण असत्य हे प्रत्येकाच्या संदर्भानुसार बदलत असतात हाच अर्थ संक्षेप सारांश म्हणजे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे. पूर्ण कविता ह्याच मूलभूत भिंगातून, सूत्रातून वाचावी.)


ओझरले नकळत अश्रू कांचनी, होता ओघळ जागृत स्मृती

ओसरले गालावरी, वाटते हळहळ किती


( संदर्भ: अचानक बसल्याबसल्या डोळ्यात पाणी यायला लागतं, काही जुन्या आठवणी जाग्या होतात. आठवणीत आपण जकडल्या जातो परंतु ते क्षण परत कधीच येणार नसतात. उगाच आपण त्यावेळी किती हतबल होतो आणि परिस्थिती बदलण्यासाठी काहीच कसे करू शकलो नाही असेही विचार डोकावतात. ह्या विचारांवर आपला ताबा राहत नाही. भक्तिभावात तल्लीन झाल्यानंतरही डोळ्यात पाणी येतं. ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही अवस्थांमध्ये असे होते ह्या अर्थी. )

 


दुर्मिळ हा योगायोग, केलेस हाथ पुढे योग्यवेळी

तेंव्हाच तुम्हाला धन्यवाद, गेले द्यायचे राहुनी


( संदर्भ: आपण स्वतः मधे एकटे काहीच नाही ह्या अर्थी. जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपल्याला कोणी ना कोणी मदत केली असते दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात पण आपण त्या त्या व्यक्तींचे पाहिजे तितके आभार मानत नाही आणि त्या भावनिक अवस्थेत त्यांची आठवण येऊन खूप हळहळ वाटते. आरती प्रभूंनी तर म्हंटले आहे: 


' गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे

माझ्या पास, आता कळ्या आणि थोडी ओली पाने '  


ह्याचा अर्थ 'हाय मी तुझे देणे कधीच फेडू शकत नाही' असाच मी घेतो. ह्याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की 'मी ह्या जन्माचे चीज करू शकलो नाही'. आरती प्रभूंच्या कविता गूढ असतात आणि त्यांचा अर्थ शोधणे म्हणजे समुद्राचा तळ शोधण्या सारखे आहे. महान कवींविषयी पामरांनी न बोललेलेच बरे. )


सृष्टीचे मिटत नाही देणे, ममतेचे घटत नाही येणे

श्वासात श्वास जोवर आहे, संपत नाही माझे घेणे


( संदर्भ: मनुष्य सतत घेतच असतो आणि सृष्टीला तो घाणीपलीकडे काहीच कसे देऊ शकत नाही आणि असे जरी असले तरी सृष्टीचे देणे संपत नाही ह्या अर्थी.)



कवाडे भांडाराची सृष्टीच्या, निर्मोह सदा लयलूट करिती

धुसफूस घेणाऱ्याची वापस देण्या, अपेक्षाच वापसीची देणाऱ्यास नाही


( संदर्भ: सच्च्या देणाऱ्याला, घेणाऱ्याने परत करावे ह्याची अपेक्षा नसते, ह्यालाच निरपेक्ष देणे म्हणतात, ह्या अर्थी)


तुम्ही होता व्यस्त कार्यप्रवाही, मीही द्विधा त्रस्त माझ्यापरी

मार्गदर्शन उत्तम, पायाबांधणी तुम्ही केली


( संदर्भ: मनुष्य जेंव्हा द्विधा मनस्थितीत असतो, ज्या वेळी काय करावे कळत नाही, त्यावेळी जे तुमचा हात धरून तुम्हाला मार्गदर्शन करतात, वाट दाखवतात, तेही स्वतःचा व्याप सांभाळून आणि त्यातूनच तुमची पायाबांधणी होते, अश्यांप्रती कृतन्यता ह्या अर्थी)


चुका केल्या फार, जाणीव होते आत्ता त्याची

कानबजावणी योग्यवेळी, पडद्याआड दरवेळी


(संदर्भ: आपण आधी किती बालिश होतो आणि मोठ्यांनी आपल्या चुका कश्या पद्याआड केल्या मोठ्या मनानी आणि ते आठवून लाजही वाटते ह्या अर्थी.)


नाही केली अपरिपक्वतेची हेटाळणी, परिपक्व तुम्ही होता

मार्ग परिपक्वतेचा, तुम्ही दाखवला


वार्धक्य आले, वर्दळ क्षमली

स्फुरण विचारांचे, लेखणी आतुरली


(संदर्भ: म्हातारपणी मनुष्य कसा आध्यात्मिक होतो ह्या अर्थी खालील सर्व कडवे)


घेऊन साचलेल्या कर्माचा उकिरडा, आला जन्मा घेऊन मतीची मर्यादा

बुध्धीपलीकडील बुध्धीमत्तेला, शोधशील कधी रे वेड्या


बुध्धीची मर्यादा, न मिळू देई जीवा शिवा

फेऱ्यात सर्वदा , कालचक्राच्या वाहिला


भवसागरी भोवऱ्याला, स्मशानज्ञान न रिझवी

भोवऱ्यात अडकला, निसटण्या मार्ग न सापडी


(संदर्भ: बुध्धी मनुष्याला मर्यादित करते. ह्या बुध्धीच्या मर्यादेला लांघून वैश्विक बुध्धीचा पाठपुरावा करणे, हे मनुष्य जन्माचे लक्ष्य असायला पाहिजे, 'टू बिकम वन विथ द युनिव्हर्स'  ह्या अर्थी. जोपर्यंत ही बुद्धीची मर्यादा आहे, तोपर्यंत जन्म मृत्यू चक्र सुरु राहणार ह्याही अर्थी.)


दुर्मिळ दुराग्रही शुचिर्भूत चित्ताचा, पाठलाग कर निग्रही

ह्या जन्मी ना त्या जन्मी, हाती लागते; ठेव निश्चिती


(आत्म शुध्धीसाठी ह्या अवस्थांमधून जावे लागते - जागृती, स्वप्न, सुषुप्ती, चित्त किंवा स्थुर्य. ह्यातही शुचिर्भूत (प्युअर) चित्ताचा जे लवकर प्राप्त होत नाही त्याच्या ध्यास केला पाहिजे. ते कधी ना कधी मिळतेच असा विश्वास स्वामी विवेकानंदांनी दाखवला आहे.)


अमोल पाटखेडकर

२४-नोव्हेंबर-२०२२

Wednesday, 23 November 2022

विरोधाभास

चित्त नाही स्थिर, भटके दिशोदिशी फार

परिसाची ओढ, म्हणे मी साधू सात्विक || १ || 


म्हणे मी मुल्ला, जाणतो मी अल्ला

करी फार कल्ला, स्त्रीलंपट तामसिक || २ ||


(संदर्भ: जे लोक स्वतःला गॉडमेन म्हणवून घेतात आणि समाजाला उपदेश करतात, ते स्वतः किती विषयाधीन असतात, ह्यावर कसलेले ताशेरे पहिल्या दोन कडव्यात आहेत. म्हणून अशा कुठल्याही स्वघोषित साधूच्या मागे कधीही लागू नये. संत गजानन महाराजांनंतर, सच्चा संतांचा अकाल पडला हे दुर्दैव.)


युध्दात दाखवून पाठ, पळून गेला

नियुक्त आम्ही ज्याला, सरदार केला होता || ३ || 


(संदर्भ:  ह्या कडव्यात जे ढोंगी आणि दांभिक खोटा आव आणणारे असतात ते खरी वेळ आली की कशे पळून जातात हे दर्शवले आहे.)


मिटेस्तोवर तेवत होती, वात माझ्या ज्योतीतली

स्वाभिमानी म्हणूनच वाटली, पर्वा अस्तित्व्याची नाही केली  || ४ ||


(संदर्भ: कडवे ३ आणि  कडवे ४ मध्ये विरोधाभास आहे. जे लोक ध्येयनिष्ठ असतात ते उच्च उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी स्वतः ची देखील पर्वा करत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांजवळ स्वतःची पर्वा न करता जीव देणारे अनेक लोक होते.)


बेकार सुकलेल्या, गवताच्या पातींना

चिमण्यांनी वापरल्या, घरटे बनविण्या || ५ ||


व्यर्थ जंगलेल्या, तुकड्यांनी तारेंच्या 

सहारा घरट्याला, एकाक्षच्या  || ६ ||


निरर्थक त्या, खंडहराला

संसार कबुतरांनी, थाटला || ७ ||


(संदर्भ: कडवे ५, ६, ७ ह्याचा कडवे १, २, ३ शी विरोधाभास दर्शविलेला आहे की प्राणी कुठलाही ढोंगीपणा किंवा आढेवेढे न घेता कसा आपला संसार थाटतात लहान सहान गोष्टींचा वापर करून. मनुष्याला अजून जास्त ची हाव मात्र फार.)


बेकार, व्यर्थ, निरर्थक; वाटे जे आपल्या

वापर सजीव निर्जीवांचा, होत असे कल्पेनेवेगळा || ८ ||


(संदर्भ: सृष्टीमधील काहीच कसे वाया जात नाही ह्या अर्थी.)


आपल्या हिश्श्याची भाकरी, वाटली ज्याने भुकेल्यांना 

अवतारच परी, त्यांना तो वाटला || ९ ||


(संदर्भ: तहानलेल्याला पाणी पाजणे आणि भुकेल्याला अन्न देणे, ह्यापेक्षा श्रेष्ठ दान नाही)


अचानक सुदामा, आला जेंव्हा

सोनेरी दिवस, झाला कृष्णाचा || १० || 


(संदर्भ: जेंव्हा जेंव्हा आपले मित्र, आप्तेष्ट आपल्याला भेटायला येतात, त्याच दिवशी दिवाळी दसरा मानावा कारण ते अमूल्य असतात)


भाग्य पालटले, सुदाम्याचे

परमोच्य आनंद, परमेश्वर भेटल्याचे || ११ ||


(संदर्भ: अतिथी ने देखील तितकाच मान आतीथ्येयाला द्यावा ह्या अर्थी )


खूप श्रीमंत आमिषयांची ,होती तुझी दुनिया

प्रलोभनांचा आम्ही त्या, अस्वीकार केला होता || १२ || 


(संदर्भ: आजकाल श्रीमंती चे मोजमाप ऐहिक मालमत्ता किती आहे ह्यावरून केल्या जातं, परंतु खरी श्रीमंती ह्या प्रलोभनांना लांघून जाण्यात आहे ह्या अर्थी )


अमोल पाटखेडकर

२४-नोव्हेंबर-२०२२

बंड प्रगतीचे

घाबरतात बोलायला इतर, तू तेच लिही

नव्हती कधीच इतकी काळी रात्र, लिही


खोटी स्तुतीवचने होती लिहिली, फेकून दे ती हुकुमी लेखणी

जुटवून हिम्मत सत्यवचनी, होऊ दे ती वाहती लेखणी 


ज्या कारनाम्यांना काळ्या, मिळत नाही वृत्तपत्रात जागा

होऊ दे त्याची उजळणी, लेखणीतून तुझ्या


बरे वाईट होऊन गेले जे, त्याचा कदाचित उल्लेख कुठेतरी

व्हायला पाहिजे पण जे , तू तेच लिही


हाती नाही तुझ्या जन्म, घाणीत उगवतो अंबुज

नाही तरी घाणीचा परिपोस, देऊळी पडतो जाऊन


उगाच जन्मास कोसी, नशिबावर खापर फोडी

प्रयत्नात गती कमी, प्रगतीस खीळ ठोकी


पाश रूढी-प्रथांचे, दे तोडून सर्व

नवीन उद्याच्या कांतीचे, स्वागत करतो निसर्ग


स्वप्नांना उद्याच्या आज, घाल खत पाणी 

टवटवेल बाग मग, प्रयत्नांना बोथट येईल धार भारी


अर्थ:

अंबुज: कमल

परिपोस: लवलेश: किंचितही



अमोल पाटखेडकर

२३-नोव्हेंबर-२०२२


अमोल, 

तुझी 'बंड प्रगतीचे' ही कविता अत्यंत समर्पक, मार्मिक व आपणा सर्वांच्याच मनात अत्यंत उत्कटपणे नेहमी येणारी प्रतिक्रिया आहे. समाजात वावरताना अनेक 'काळ्या' गोष्टी दिसत असतात पण त्यांना वाचा फोडण्याचे धैर्य समाज - मानवात नसते. सगळे बोक्कामुच्चू होऊन जातात. खरे वास्तव वेगळेच असते व दर्शनी रुप वेगळेच भासवले जाते. अनेकानेक घटनांचा आकार एकतर विद्रूप केला जातो किंवा अवास्तव दर्शनीय!! प्रत्येकाने समाजात व व्यक्तीच्याही जीवनात घडणाऱ्या घटनांचा विचार केला तर 'मुखवटे' धारण केलेल्या घटना व व्यक्तीच आढळतात हे अत्यंत 'सत्य' आहे. 


  तुझ्या मनात येणारे विचार अत्यंत परिपक्व असतात. खूप अभ्यासाने तू जाणकार, विचारवंत झाला आहेस. ठाम मतांचा, उदार विचारसरणीचा, जग पाहिलेला साक्षेपी माणूस तू तुझ्या कवितांतून अभिव्यक्त होतोस याचे मला अत्यंत कौतुक आहे. 


  जे मला जमले नाही, ते तू करतो आहेस. अभिव्यक्ती ही नेहमी सच्ची असावी. ती तुझी आहे. सच्चा माणूस त्याला विरोधक खूप असतात. आपण आपला दृष्टिकोन बदलू नये हेच इष्ट!! 


  तुझी 'विरोधाभास' ही कविताही विचारपरिपक्वतेने नटलेली व विचारांची अभिव्यक्ती तर उत्तमच!! वेगळेच विचार, वेगळ्याच धाटणीने लिहून तू तुझे वेगळेपण सिध्द करतो आहेस. अशाच अनेक विचारांचा आस्वाद आम्हाला दे. 


                संगीता पाटखेडकर 

                 २४/११/२०२२

Thursday, 17 November 2022

मृत्यू

तूच माझा सोबती, अनादी अनंत माझा

कंठ तुझ्या येण्याने, आकंठ हा भरला


ऐसे नाही, मी नाही कधीच अनुभवले तुला

वेळ आली वाटले जरी, काळ आला नव्हता


तू पालनकर्ता आज्ञेचा, मी स्वच्छंदी जीवनवेडा

यायचे तेंव्हा येशीलच, प्रकार नाही न्यारा


तू येणार निश्चित, पूर्वकल्पना होती मजला

तरी कानी कपाळी ओरडून, कोलाहल नाही केला


जेंव्हा जेंव्हा आलास तू, होतो मी सज्ज समर्पित तुला

परिपाक माझ्या फलश्रुतीचा, तुझ्यातच अंतर्धान पावला


आभार मानू तुझे किती रे, आपणहूनच तू आला

माझ्या गंतव्याच्या प्रार्थना, आधी आप्तांनी करावयाच्या


धन्यवाद अनेकानेक तुजला, मी क्षीण होण्यापूर्वीच आला

आवभगत करण्याचा, वेळ पुरता दिला


माहित आहे निश्चित मजला, नाशिवंत प्रेत माझे तुजला

शाश्वत कैवल्याचा, तूच एक पुरस्कर्ता


सुसज्य मार्ग तुझ्या येण्याने, नवीन जीवनचक्राचा

एक संपला, नवीन अंकुर उभा दुसरा राहिला


आसक्ती ने माझ्या वळून मागे पाहिले, जवळीक काही आप्त पाणावलेले डोळे होते

वाटले सांगावे त्यांना मी तर इथेच आहे, यमदूताने पण मला ओढतच नेले


राख माझ्या अशाश्वताची, गात्रांनीच पाहिली

माझे अस्तित्व तुझ्यासवे, सुरक्षित प्रवास करी


घाबरलो नाही किंचितही मी तुला, नेतेवेळी तू जिंकला

परंतु दरवेळी हरवून तुला, पुनर्जन मी घेतला


अमोल पाटखेडकर

१७-नोव्हेंबर- २०२२


मराठी साहित्यामध्ये मृत्यूवरील उत्कृष्ट काव्य भा. रा. तांबे ह्यांचं मानलं जातं.

संदर्भ - ' जन पळभर म्हणतील हाय हाय '


भाऊसाहेब पाटणकर ह्यांनी मराठी शायरी प्रकारात मृत्यूवर विनोदी अंदाजाने लिहिले आहे.

संदर्भ - ' कफन माझे दूर करुनि पाहिले मी बाजूला, एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला '


गीतेमध्ये तर कृष्णाने मृत्यूला नगण्य मानले आहे. आत्म्याला मरण नाही ह्यावरच भर आहे आणि त्याहीवर जे काही होते ते मीच करतो म्हणून जन्म मृत्यचा भार दोष फक्त आणि फक्त माझ्यावरच आहे असे म्हंटले आहे. निमित्त मात्राला मात्र आपणच दोषी आहो असे उगाच वाटत राहते, अशी अर्जुनाची समजूतही काढली आहे.


असे जरी असले तरी, माझ्या मृत्यूनंतर काहीच कसे बदलत नाही ह्यावरच जास्त भर आहे. प्रत्यक्ष्य मृत्युवरती काहीच नाही. 


Due to cyclical nature of the universe, we go through birth, death, and re-birth cycles again and again. Creation, preservation, and destruction is the constant phenomena in the universe. The universe we are part of is the smallest in the entire multiverse. The expanse of multiverse is beyond our imagination and is very complex.


असे जर आहे तर आपण मृत्याला आधी कित्येकदा अनुभवलेले आहे. मागच्या जन्मी, त्याच्या मागच्या जन्मी, त्याच्याही मागच्या जन्मी वगैरे वगैरे.  मग ह्याच वेळी त्याचे इतके नवल काय? तो आला कि मी पूर्णत्वाला जातो, म्हणून तो माझा सखा सोबती आहे - आजचा नाही अनंत काळापासूनचा. त्याचे येणे म्हणजे निसर्ग नियम कायम आहे ह्याचा प्रत्यय येतो. उगवणी नंतर कापणी होणे साहजिकच आहे. ती झाली नाही तर नासाडी होते. ह्या जन्मात जे केले, त्याचे परिमार्जन मृत्यूतच होते आणि परत नवनिर्मितीची सुरवात होते.


* कृष्णाचा एक छान उल्लेख आहे, ज्यातून हे विश्व किती मोठे आहे हे कळते.*


एकदा ब्रह्मा कृष्णाला भेटायला द्वारकेला येतो आणि द्वारपालाच्या सांगतो, जा कृष्णाला सांग ब्रह्मा आला आहे. द्वारपाल कृष्णाला सांगतो. कृष्ण द्वारपालाच्या सांगतो, जा विचार त्याला, कोणता ब्रह्मा आला आहे ते. ब्रह्मा म्हणतो, जा सांग कृष्णाला तो चार तोंडाचा, चार पुत्रांचा पिता ब्रह्मा आला आहे. ब्रह्मा आतमध्ये जातो. कृष्णाला विचारतो, तू असे का विचारलेस, माझ्याशिवाय अजून कोणी ब्रह्मा आहे का? तेंव्हा कृष्ण आपल्या योगसिध्धीने, इतर ब्रह्मांना बोलावतो - शंभर तोंडी, दहा हजार तोंडी, १० लाख तोंडी, १ करोड तोंडी आणि चार तोंडी ब्रह्माला सांगतो कि तू बनवलेले विश्व सर्वात लहान आहे. ह्या बाकीच्यांनी बनवलेली विश्वे कितीतरी मोठी आहेत आणि त्या प्रत्येकाचा एक ब्रह्मा, एक विष्णू, एक महेश आहे. तुला मी तू जितके पाहू शकतो तितकेच ब्रह्मा दाखवले. असे अगणित ब्रह्मा आहेत.


अमोल पाटखेडकर

१८-नोव्हेंबर- २०२२


अमोल


  तुझी 'मृत्यू' ही कविता वाचल्यानंतर 'आयुष्याचा' पूर्ण विचार करणारा आणि अनंत अनुभवांना सामोरा जाणारा आणि निरंतर जीवनाचाच पुरस्कार करणारा एक भावुक व्यक्ती म्हणून तू माझ्यासमोर उभा राहिलास!!


   तू किती हळवा आहेस हे मला माहित आहे. आप्तस्वकीयांचे 'मृत्यू' तू बघितलेस आणि खूप हवालदिल झालास. प्रमोद, तुझे वडील, अरुण, आजोबा, मावशीआजी व तुझ्या मित्रपरिवारातील जवळच्यांच्या मृत्यूने तू हेलकावून गेलास. 


  आजारपणाच्या बातम्या तुला त्या त्या आजाराचे सखोल  संशोधन करण्यास प्रवृत्त करतात व तू पूर्ण सजग होऊन त्याचा अभ्यास करतोस आणि 'शरीर व त्याचा मृत्यू' या गोष्टी तुझ्या अंतर्मनाला व्यापून टाकतात. तू अभ्यासू , विचारी आणि तरीही जीवनाला सामोरा जाणारा आहेस. प्रत्येक व्यक्तीची ही अटळता आहे. 


  'नचिकेता' हा मृत्यूचा शोध घेण्यासाठी यमद्वारी गेला होता. कठोपनिषदातील ती कथा तुला माहित आहे. पण मृत्यूची भीती बाळगून काहीच निष्पन्न होत नाही. ती अपर्यायी व्यवस्था आहे. जीवनाचे ते अटळ रहस्य सामान्य माणसाच्या आवाक्यापलीकडचे आहे. 

   'आपुले मरण पाहिले म्यां डोळा

    तो सुखसोहळा अनुपम्य' - असे तुकाराम महाराजच म्हणू शकतात. 


  'रोजचे मरण रोज,' माणूस तरीही जगतच असतो. ही शाश्वतता महत्वाची आणि ती तुझ्या कवितेत उत्तमरीतीने अधोरेखित केली आहे. 'गीतेचे तत्वज्ञान' छान शब्दात सांगितले. तुझ्या विचारप्रवणतेचे, अभ्यासांचे व आशयाच्या मांडणीचे कौतुक वाटले. 


  'मृत्यू' या संकल्पनेने ग्रासलेला नाही असा विचारी माणूस नाहीच आहे; तरी त्या विचाराला शब्दबध्द करणे हे अवघड काम तू केले आहेस, - हे तुझे यश!!


   या संदर्भात मला मृदुलाची 'सदासर्वकाळ' ही तिनेही १५ नोव्हेंबर २०२२ ला लिहिलेली कविता समर्पक वाटली. 'काळ' म्हणजे मृत्यू म्हणजे 'यम' असे आपण समजतो, पण हा काळ त्याच्या गतीने चालत राहतो व कुणासाठीही थांबत नाही. गतवर्तभविष्याचा 'उंबरठा' नेहमीच ओलांडणारा तो, 'काळ' तो!! जन्ममृत्यूच्या 'पल्याड तो' - या ओळी मला खूप समर्पक व सुंदर वाटल्या. 


   तुम्हा दोघांच्याही कविता वाचल्यानंतर इतकी विचारप्रवणता तुम्ही अभिव्यक्त करु शकता याचे खूपच कौतुक वाटले. विचारांची काव्यात्म अभिव्यक्ती ही खूप कठीण गोष्ट तुम्ही दोघांनीही साध्य केली आहे. हे मेंदूच्या सशक्ततेचे लक्षण आहे. मेंदूला नेहमीच असे सशक्त, सजग ठेवा म्हणजे तो मेंदूही खूप कार्यप्रवृत्त होतो आणि विस्मरणाच्या विळख्यात सापडत नाही. मेंदूला नेहमीच चालना दिली तर इतरांच्या मेंदूलाही चालना देण्याचे काम होते; हे तुमच्या कवितांवर लिहिण्याची मला बुध्दी झाली, यावरुन समजून येईलच!!


             संगीता पाटखेडकर 

              १८/११/२०२२

Thursday, 3 November 2022

दुखी मन

मरहूम इस दिल में

कोई शमा; जला अब उमंग नहीं सकती

तूने ठुकराया हैं

किसी दूसरीको; जगा अब मिल नहीं सकती


तसव्वुर में

ही अब तुम्हारी जुस्तजू कर सकते हैं

और इसी तराह से इस फ़िराक-ए-मजरूह दिल में

तुम्हे पाबन्द कर सकते हैं


इस फुवाद में 

तुमसे गुफ्तगू करने के सारे रास्ते बंद हैं

और एक हम हैं

जो फिर भी तब्दील की आस लगाए बैठे हैं


इस कदर तासीर हुआ हैं

कहर तुम्हारी मोहब्बत का इस दिल में

ना जी सकते हैं

ना मर सकते हैं


खुश नसीब हैं

वो लोग जिनकी बंदगी रंग लायी

और एक हम बेकार हैं

जिसकी परस्तिश कभी काम ना आयी


खुश नसीब हैं 

वो लोग जिनकी मोहब्बत बुज़ुर्ग हुई

और एक हम बद नसीब हैं 

जिसकी कभी जवां नहीं हुई


हसरत पे हमारी ज़माने को भी रोना आया

काफिला साथ फिर भी हमने खुदको तनहा पाया 

ये मोहब्बत का नशा इस कदर हमें दूर लाया 

की सामने हमने मज़ार पाया 

की सामने हमने मज़ार पाया


अमोल पाटखेडकर

०३-नोव्हेंबर-२०२२ 

आलीस तू

आलीस तू जीवनात बहार बनुनी 

बघुनी तुझ्यात स्वतःला मनोमनी 

हरवतो ग साजणी 


तू आलीस जीवनात अशी 

जणू पावसाची सरी 

पाहतो तुझ्याकडे मी 

वाटते मला तू इंद्रधनू सारखी 


तू आशा माझ्या स्वप्नातली

तूच भावना माझ्या चित्तातली

तूच ओळख मला आठवणीत नेणारी 

तुझेच नाव सदैव ओठावरी 


तू उन्हाळ्यातही 

राहणारी माझ्या सवे बनुनी सावली

तू संकटातही

डगमगू मला न देण्याऱ्या पेपर Weight सारखी


तू मन मोहिनी

तू रास रागिनी

तू अंधारी तिरिक प्रकाशाची

तू हळुवार झुळूक हवेची


तू येशी जेंव्हा जवळी 

विविध भाव अंतरी

उमलती एकाएकी 

तरंगती शरीरातूनी


समजले मला आज हे सर्वतोपरी

तूच आहेस माझी सखी साजणी

चंद्र जर असेल नभीचा मी

तर तूच आहेस माझी चांदणी

तर तूच आहेस माझी चांदणी 


अमोल पाटखेडकर

०३-नोव्हेंबर-२०२२