Tuesday, 18 May 2021

मतभेद

गाठ अधिक दृढ होते, आवळल्या जातो पेच!

सामंजस्याचे ठिगळ, सोडू पहाते बंधन हेच!


होता जो निवळला सूर भेसूर, जिंव्हा काढून आहे उभा!

डिवचून वाणीने धारदार, शिरच्छेद करीत आहे भावनांचा!


फुटला बांध, झाले आयुष्य विस्कळीत!

न जुळणाऱ्या, रेषांसारखे समांतर फलित!


एकत्र जरी विभक्त आपण, मार्ग आपुले वेगळे!

कडूगोड आठवणींचे भांडार, हृदयात साठवले!


मुक्तता बंधनात, अत्यावश्यक!

स्वातंत्राला बंधन, रोग विनाशक!


ह्या नियमांचे उल्लंघन, अपघाताचे कारण!

आपुले आपण सर्वस्वी जबाबदार, दोष दुसऱ्या विनाकारण!


अमोल पाटखेडकर

१९-मे-२०२१



No comments:

Post a Comment