जीवन
सागर नाही परिपूर्ण
किनारा
त्यासही अपूर्ण
कधी
अशक्य वाटे शक्य
कधी
शक्य वाटे अशक्य
कपोलकल्पित
स्वप्नांचे
किती
बांधावे उंच मिनार
तरीही
गाठू बघते ध्येयपथ
अपूर्णता
नसतेच उणीव
जगण्याची
सार्थ जाणीव
मनांस
निववी सैरभैर
अपूर्णतेनेच
वाट दावावी
अंधारातही
ज्योत उजळावी
तमाची
तमा न बाळगता
मात
करावी भरभर
अपूर्ण
आपण, अपूर्ण सारं
पूर्णत्त्वासी
दूर सागर
अथांग
तरीही, अनंत जरीही
जगण्याची
हरएका ओढ अनावर
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
१९
नोव्हेंबर २०१९.
No comments:
Post a Comment