Colgate - Palmolive - Peet Soap Company चा प्रेसिडेंट E. H. Little हा नेहमी स्वतःवरच्या व निर्मित मालावरच्या लोकांच्या प्रतिक्रियांसंबंधी उत्सुक असावयाचा. इतरांच्या प्रतिक्रिया जास्तीतजास्त चांगले काम करण्यासाठी त्याला प्रेरणा द्यायच्या. जगातील श्रीमंतांमध्ये त्याच्या या निष्ठेमुळे त्याची गणना व्हायला लागली. स्वतःचे स्वतःविषयीचे मत कधीच खरे नसते. तुम्ही काय आहा हे दुसराच जास्त चांगल्या पध्दतीने सांगू शकतो. मंबाजी आणि सालोमालोने तुकारामाला खूप त्रास दिला, पण त्यांच्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम खूपच प्रगत झाला. आयुष्यात ज्या अनावश्यक मूर्खपणाच्या गोष्टी घडल्या त्यांची समीक्षा प्रत्येकाने करायचे ठरविले तर व्यक्तित्वविकास होणार! परिपूर्ण कुणीच नसतो. परिपूर्णतेकडची वाटचाल खूप अवघड असते आणि त्यात अडथळ्यांची शर्यत असते. या अडथळ्यांना पार करताना लोकांनी केलेल्या समीक्षणाची हेटाळणी न करता जर बारकाईने त्यांचे म्हणणे ऐकून त्यावर विचार केला तर प्रगतीची वाट सुकर होते हे तेव्हाच लक्षात येते.
'Remember that no one ever kicks a dead dog.'
लिंकनचा सेक्रेटरी 'स्टँटन', लिंकनला 'a damn fool' म्हणाला. लिंकन न चिडता त्याच्याकडे गेला, त्याचे म्हणणे समजून घेतले आणि आपण काढलेली order चुकीची आहे हे त्याला पटले, त्याने ती cancel केली. मोठा कोणताही निर्णय हा अनेकांच्या मतांचा विचार करुन घेतला गेल्यास योग्य असतो; पण कार्यपूर्तीसाठी कार्यकर्त्यांची जी साखळी असते ती खूप निष्ठावान व अचूक अंदाज वर्तवणारी असावी लागते. 'आग्र्याहून सुटकेचा' शिवाजीचा प्रयत्न ही किती धाडसी योजना होती. जीवन-मरणाची सीमारेषा खूपच अस्पष्ट, अंधुक व बेभरवशाची होती; पण जीवाला साथ देणारे लोक जे शिवाजीने जमविले होते ते प्राणाची बाजी लावणारे होते आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयात हिरीरीने शिवाजीला मदत करण्याच्या वृत्तीचे होते. इतके सगळे जमून येणे खूपच अटीतटीचे असते, पण शिवाजीला ते जमले कारण निष्ठा माणसाला खूप बळ देते. निष्ठेचा परिणाम अनेकांत संकरित होत असतो. निष्ठावंतांची मांदियाळी निर्माण होते आणि गड सर केला जातो. २५ मार्च २०१६ ला ३६७ वी 'तुकारामबीज' होती. इतक्या वर्षानंतर का बरे लोक इंद्रायणीतीरी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते? कारण त्यांची तुकारामाच्या व्यक्तित्वावरची, त्याच्या जीवनप्रेरणांनी त्यांना दिलेल्या चैतन्यपूर्ण अस्तित्वाविषयीची ती निष्ठा होती. व्यक्तित्वाची 'घडण' ही अशी अनेक अडथळ्यांना पार करणाऱ्या आधीच्या चैतन्यदायी व्यक्तिमत्चांनी घडविलेली असते. खूप उदाहरणे देता येतील.
'i am far from perfect' ही सच्ची जाणीवच माणसाला पुढे-पुढे जाण्याची जिद्द देत असते.
'Be frank, Don't pull your punches' असे आवाहन करण्याची क्षमता असणे आणि होणाऱ्या समीक्षणातून शिकणे ही प्रवृत्ती निश्चितच स्वीकारार्ह ठरेल.
'Do the very best you can and then put up your old umbrella and keep the rain of criticism from running down the back of your neck.' म्हणतातच ना!
संगीता पाटखेडकर.
२७/२/२०१६.
No comments:
Post a Comment